आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Friday, October 28, 2011

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी च्या संदर्भात काही महत्वपूर्ण माहिती

साधारणतः ३ वर्षांपूर्वी तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मूर्तीची झीज होत आहे, असा निष्कर्ष शासकीय खात्याच्या वतीने काढून त्या मंदिराचे प्रशासक असलेल्या धाराशीवच्या जिल्हाधिकार्‍यांनी तिच्यावरील अभिषेकावर बंदी घातली. पुजारी आणि धर्माधिकारी यांना विश्वासात न घेता घेतल्या गेलेल्या या प्रशासकीय निर्णयामुळे तब्बल ७ दिवस तुळजापूर पेटले होते. अखेर न्यायालयात हे प्रकरण गेले. २३ सप्टेंबर २०११ या दिवशी या प्रकरणी न्यायालयात निकाल देण्यात येणार आहे. यानिमित्ताने तुळजापूर येथील पुजार्‍यांनी मांडलेली बाजू आणि ‘हिंदु धर्मशास्त्र काय सांगते ?’, याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

तुळजापूर येथील या प्रकरणामुळे मंदिरांच्या धार्मिक विधींत शासकीय हस्तक्षेप होण्याचा नवा पायंडा पडू पहात आहे; कारण तुळजापूरनंतर २१ जानेवारी २०११ या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरांतील मूर्तींवरील अभिषेकही हेच कारण देऊन शासनाकडून थांबवण्यात आला. देवस्थानांच्या धार्मिक विधींमधील हा शासकीय हस्तक्षेप आजच न रोखल्यास पुढे महाराष्ट्रात आणि त्याही पुढे देशभरात सर्वत्रच्या देवस्थानांमधील मूतींवरील अभिषेकही थांबेल. हळूहळू धर्मद्रोही शासन हिंदूंच्या धर्मश्रद्धेचे स्थान असलेल्या ‘मंदिरांत काय असावे आणि नसावे ?’, हेही ठरवू लागेल आणि तेथे शासनाची धर्मद्रोही धोरणे राबवली जातील; म्हणून धर्मश्रद्धेच्या रक्षणार्थ देवस्थानांमधील शासकीय हस्तक्षेपाला विरोध करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य ठरते !
----
    संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणून अनादी काळापासून सर्वांना परिचित असलेली तुळजापूर येथील श्री भवानीदेवी !
    या देवीची पूजा आणि आराधना संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांसह संपूर्ण भारत देश करतो. श्री भवानीदेवीच्या पूूजाविधीमध्ये अनेक प्रकारचे पूजाविधी अनादी काळापासून चालत आलेले असून आपल्या नवसाप्रमाणे हे पूजाविधी करण्याची पद्धत आहे. हे विधी करण्यामागे श्री देवीचा कुलाचार करणे, कुलदेवतेला प्रसन्न करणे आणि घरात आरंभलेले शुभकार्य पार पाडणे इत्यादी अनेक उद्देश असतात.

या सर्व पूजाविधींमध्ये प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर केला जाणारा पूजाविधी म्हणजे ‘भोगी अभिषेक’! यामध्ये दही, दूध, केळी, साखर आणि लिंबू इत्यादी पदार्थ मूर्तीस लावून भक्तांना ते प्रसाद म्हणून परत दिले जातात. भक्त पंचामृत म्हणून ते ग्रहण करतात.

१. पूजाविधी करण्यामागील पूर्वापार चालत आलेला उद्देश : भक्तांकडून आणलेल्या साहित्याच्या माध्यमातून कुलदेवतेच्या मूर्तीची जोपासना, राखण व्हावी आणि तिची सुंदरता टिकून रहावी, हा उद्देश असतो. दूध, मध, लिंबू, दही आणि साखर या घटकांमधील तत्त्वाने देवीच्या मूर्तीच्या गंडकी पाषाणाला चांगला उजाळा येऊन मूर्ती सुंदर अन् आकर्षक दिसते. हे पदार्थ वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारची झीज होत नाही. या मिश्रणातून अतिशय चांगले जीवनसत्त्व असणारा पदार्थ निर्माण होतो आणि भक्तांनी तो ग्रहण केल्यास त्याला न मिळणारी जीवनसत्त्वे मिळतात. अशा प्रकारे देवीच्या मूर्तीचे रक्षण आणि भक्त यांचा विचार करूनच हा पूजाविधी अनादी काळापासून चालू आहे.

२. ‘भोगी’ पूजाविधी करण्याची पद्धत
अ. पूजाविधी करतांना प्रथम देवीच्या अंगावरील सर्व वस्त्रे काढली जातात. त्यानंतर थंड पाण्याने संपूर्ण मूर्तीची स्वच्छता केली जाते.
आ. स्वच्छतेच्या वेळी वापरण्यात येणारा कुंचला वाळ्याच्या मुळ्यांपासून बनवलेला असतो. वाळ्याच्या मुळ्या अतिशय मऊ आणि सुगंधी असतात अन् त्यात असलेल्या तत्त्वांमुळे मूर्तीच्या खाचखळग्यात कोठेही अस्वच्छता रहात नाही.
इ. अभिषेक पूजाविधी संपतांना मूर्ती पुन्हा स्वच्छ, थंड पाण्याने धुऊन, मऊ कापडाने पुसून स्वच्छ केली जाते.
ई. अभिषेकपूजा चालू असतांना कोणत्याही प्रकारच्या गतीमान दबावयुक्त पाण्याचा (प्रेशराईज्ड वॉटर) किंवा रसायनांचा वापर केला जात नाही.
    देवीच्या मूर्तीची हाताळणी पुजारी अत्यंत लक्षपूर्वक आणि संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेऊनच करतात. आजपर्यंत पूजाविधी करतांना मूर्तीची कोणत्याही प्रकारची झीज झाल्याचे दिसून आलेले नाही. पुजारीवर्गाला देवीच्या मूर्तीची स्वतःच्या जिवापेक्षाही अधिक काळजी असते.

३. गंडकी पाषाणावर पाणी, हवा, रसायन इत्यादींचा परिणाम होत नसल्याने देवीची मूर्ती बनवतांना या पाषाणाची निवड केली जाणे : या मूर्तीच्या संदर्भात इतिहासात नोंद आहे की, गडबडशहावली हसनाबादकर आणि त्या वेळचे देवीचे पुजारी श्री. माधवराव वाळके-सुरवसे पुजारी यांनी आताच्या नेपाळ प्रदेशातील गंडकी नदीच्या पात्रातून अनागोंदी येथील गंडकी पाषाण आणले आणि कुशल पाथरवटांच्या हस्ते त्यापासून मूर्ती घडवून घेतली. या पाषाणावर पाणी, हवा, रसायन इत्यादींचा कसलाच परिणाम होत नाही आणि हे पाषाण अतिशय कणखर असल्याने या पाषाणाचीच निवड केली आहे.

४. अफजलखानाच्या मूर्तीभंजनाच्या कुकृत्यापासून पुजार्‍यांनी मूर्तीचे संरक्षण करणे : मूर्ती रक्षणाविषयी इतिहासात आणखी एक पुरावा असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी अफजलखान महाराष्ट्रावरच चाल करून आला. त्याने मूर्तीभंजनाचा सपाटा लावला. छत्रपतींना भवानीदेवी साहाय्य करते, तर तिलाच उपद्रव करण्याच्या उद्देशाने त्याने येथेही आक्रमण केले. तेव्हा येथील मूर्ती पुजार्‍यांनी दुसर्‍या ठिकाणी नेली आणि देवळात अन्य मूर्ती आणून ठेवली. अफजलखानाने ती मूर्ती फोडून जात्यात भरडून काढली, असा उल्लेख आहे. अशा परिस्थितीतही पुजार्‍यांनी मूर्तीचे संरक्षण केले.

५. भक्तांना होणार्‍या आध्यात्मिक लाभापेक्षा मूर्ती टिकवण्याला जास्त महत्त्व देणारे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारचे प्रशासन !
५ अ. शासकीय अधिकार्‍यांनी मूर्तीची जवळून पहाणी न करताच तिची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढून ‘भोगी’ पूजा बंद करण्यास सांगणे : अलीकडे मंदिर प्रशासनास जाग आली आणि श्री भवानीमूर्तीची झीज होत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. या संदर्भात सूत्रबद्ध पद्धतीने चक्रे फिरू लागली. देवीच्या मूर्तीविषयी धर्मभावनेचा प्रश्न असलेला ‘भोगी’ पूजाविधी बंद करण्याचा कट शिजू लागला. त्याप्रमाणे संभाजीनगर येथील संबंधित खात्यास प्रशासनाने देवीच्या मूर्तीची पहाणी करून इतिवृत्त (अहवाल) देण्याची विनंती केली. अधिकार्‍यांनी ३ फूट लांबून मूर्तीची केवळ छायाचित्रे काढली आणि त्या छायाचित्रांवरून या मूर्तीची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढला आणि ‘भोगी’ पूजा बंद करावी किंवा मूळ मूर्तीस चांदीचे आवरण घालावे, असे सांगितले. केवळ तर्वâवितर्कांवर असे होऊ शकते ? ‘या संदर्भात नागपूर येथील आमच्याशी संबंधित कार्यालयाकडून इतिवृत्त (अहवाल) मागवावा’, असे सांगितले आहे.

६. भक्तांच्या धर्मभावना निरनिराळ्या मार्गाने चिरडून टाकण्यामागे मोठे षडयंत्र कार्यरत असून भवानीदेवीची ‘अभिषकभोगी’ पूजा बंद होऊ नये, अशी समस्त भाविकांची मागणी असणे ! : काही विघ्नसंतोषी, स्वार्थी लोकांनी प्रशासनातील अधिकार्‍यांच्या साहाय्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हिंदु भक्तांच्या भावनांचा कसलाही विचार न करता किंवा योग्य पर्यायी उपाययोजना न करता ‘भोगी अभिषेक’ बंद करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. असे झाल्यास आपल्या कुलदेवतेचा कुलाचार करण्यापासून समाज वंचित राहील. अशा प्रकारे हिंदूंच्या धर्मभावना निरनिराळ्या मार्गाने चिरडून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. हिंदूंच्या मोठमोठ्या यात्रा, उत्सव कोणत्या ना कोणत्या कारणांनी बंद पाडण्याचे किंवा न्यून करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भक्तांच्या धार्मिक भावना आणि कुलाचार यांचा विचार करता ‘अभिषेकभोगी’ पूजा बंद होऊ नये, अशी कोट्यवधी भाविकांची भावना आहे.’
- श्री. नागनाथ (भाऊ) भांजी (कदम), तुळजापूर

भक्तांना होणार्‍या आध्यात्मिक लाभापेक्षा मूर्ती टिकवण्याला जास्त महत्त्व देणारे मंदिरशास्त्राचे अभ्यासक ! : ‘गंडकी नदीतील प्रत्येक पाषाणातच देवत्व असते. तो केवळ गोटा असला, तरी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे; मात्र त्या पाषाणातून घडवलेली मूर्ती झिजत नाही, असे नाही. घडवलेल्या मूर्तीला टाकीचे घाव बसलेले असतात. त्यामुळे तिच्यामध्ये बारीक छिद्रे असतात आणि त्या छिद्रांमध्ये दही, केळी इत्यादीr राहू शकतात. त्यामुळे घडवलेल्या मूर्तीवर भोग लावणे चुकीचे आहे. शिवलिंगाला भोग लावण्याची प्रथा आहे; मात्र ते शिवलिंग स्वयंभू असावे लागते. अशा स्वयंभू शिवलिंगाची चकाकी वाढते, हे सत्य आहे; मात्र ‘घडवलेल्या मूर्तीवर भोग लावल्याने त्याची चकाकी वाढते किंवा सौंदर्य वाढते’, असे म्हणणे चुकीचे आहे. भोग लावण्याच्या प्रथेला धर्मशास्त्रात आधार नाही.’ - मंदिरशास्त्राचे अभ्यासक श्री. उमाकांत राणिंगा, कोल्हापूर

मूर्ती टिकवण्यापेक्षा भक्तांना तिचा आध्यात्मिक लाभ होणे जास्त महत्त्वाचे !
       देवाच्या मूर्ती भक्तांसाठी असतात. मूर्तींसाठी भक्त नाहीत. त्यामुळे मूर्तींची काळजी वहाण्यासाठी भक्तांना मूर्तींचा लाभ होण्यापासून दूर ठेवणे योग्य नाही. त्या पुराणवस्तू संग्रहालयातील वस्तूंप्रमाणे नसतात. मूर्ती शासनासाठीही नाहीत. विविध विधींमुळे मूर्तीची झीज झाली, तर तिचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. यावरून बुद्धीला किती मर्यादा असतात आणि बुद्धीने घेतलेले निर्णय कसे चुकीचे असू शकतात, हे लक्षात येते; म्हणून अध्यात्मशास्त्र शिकण्याला आणि ते जाणून घेण्याला पर्याय नाही.
       हिंदु धर्माचा अभ्यास नसणारे, त्यासंदर्भात धर्माधिकार्‍यांचा सल्ला न मानणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेस शासन असेपर्यंत सर्वच मंदिरांच्या संदर्भात ही समस्या निर्माण होणार आहे. हिंदूंना मिळणार्‍या चैतन्याचा स्रोत मिळू नये अन् हिंदु धर्म नामशेष व्हावा, यांसाठी साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि हिंदुधर्मद्वेष्टे काँग्रेस शासन एकजुटीने सर्व शक्ती पणाला लावून कार्यरत आहेत.
       मूर्तीभंजकांविरुद्ध काही न करणारे शासन मूर्तीची झीज थांबवण्यासाठी प्रयत्न करते, हे नाटक आहे. शेकडो वर्षे मूर्तीभंजन चालू असतांना स्वातंत्र्यानंतर सर्वपक्षीय राज्यकत्र्यांनी त्याविषयी काहीही केलेले नाही, त्यांना मूर्तीचे रक्षण व्हावे, याची कळकळ असू शकेल का ?
       हिंदूंनी एकजूट करून त्यांचे सामथ्र्य या धर्मद्रोह्यांना दाखवून हिंदुराष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे. त्यासाठी हिंदूंनो, तुमचा मृतवतपणा टाकून धर्मक्रांती करायला सिद्ध व्हा ! नाहीतर तुमचे अस्तित्व ‘हिंदु’ म्हणून उरणार नाही आणि हिंदु धर्माला काही काळ ग्रहण लागेल.
        ‘या कार्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा’, अशी श्री भवानीमातेच्या चरणी प्रार्थना !


    - डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (भाद्रपद शु. ९, कलियुग वर्ष ५११३ (६.९.२०११)

5 comments:

  1. @Sachin:
    सचिनजी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि हो धन्यवाद कसले.. तुमचे स्वागतच आहे ..

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम आणि शास्त्रशुद्ध अशी माहिती आहे...

    ReplyDelete
  3. @ वैभव कुलकर्णी:
    वैभवजी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आणि हो तुमच्या मार्गदर्शनाची देखील अपेक्षा आहे..

    धन्यवाद..

    ReplyDelete
  4. अतिशय उत्तम आणि शास्त्रशुद्ध अशी माहिती आहे...

    ReplyDelete