मुळात गणपती हा प्रत्येक घरात, घरातील कर्त्या पुरुषाने स्वत: मातीने बनवून, त्याचे पूजन करावयाचे असते. या गणपतीला "पार्थिव" गणेश असे म्हंटले आहे. "पार्थिव" म्हणजे "पृथ्वी" तत्वापासून बनलेला, आणि त्यामुळे त्याचे "विसर्जन" [सर्जन किंवा सृजन म्हणजे नवनिर्मिती] आणि हे ओघाने आलेच. कारण या "पार्थिव" सृष्टीत चिरंतन असे काहीही नाही...हो अगदी देव सुद्धा...."देव" हे फक्त परमेश्वराच्या "व्यक्त" स्वरूपाचे एक प्रतिक आहे. तो व्यक्त झाला की सृष्टी आणि अव्यक्त अवस्थेत तो असतो, "ते ब्रह्म".....मग आपण हे लक्षात ठेवायचे की मलाही कधीतरी जायचेच आहे. मग मला काहीतरी चांगले कार्य करून जायलाच हवे. ही आठवण करून देण्यासाठीच हे सारे काही करायचे.... बरं मूलाधार चक्रातील गणेशाबद्दल बोलायचे तर "मुल आधार" म्हणजे हे चक्र आपल्या शरीराचा, जीवनाचा मुल आधार आहे. आणि "गणेश" किंवा "गण" "पती" हा शरीरातील सर्व कार्यकारी "गणांचा" पती आहे. आपले सारे संस्कार या मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत असतात. आणि येथील "गणपती" या जन्मातील आपण घेऊन आलेल्या प्रारब्धाप्रमाणे, तसेच आपण या जन्मात करीत असलेल्या बरया वाईट कर्मान प्रमाणे आपले बोलणे, वागणे, चालणे.....या जन्मातील आपल्या साऱ्या कृतींचे संचालन करत असतो.
आपण बोलत असलेले शब्दही येथेच सुप्त रुपात असतात. म्हणूनच श्री गणेशांची उपासना करताना मूलाधार चक्रावर लक्ष देऊन, पृथ्वी मुद्रा करून "गम" बीज असलेले, तसेच इतरही गणेश मंत्र, स्तोत्रे, श्लोक म्हणावयाचे असतात. त्यावेळेस समृद्धी मिळण्यासाठी "हिरव्या" रंगाच्या, पचन, आरोग्य, संपत्ती यासाठी "पिवळ्या" रंगाच्या, मनाला शक्ती मिळण्यासाठी "केशरी" रंगाच्या आणि मोक्ष प्राप्ती हेतू असेल तर "पांढऱ्या" गणेशाच्या पार्थिव, लाकडी अथवा धातूच्या मूर्तीचे पूजन करावे. हे गणपतीचे बाह्यरूप झाले. एकाग्रता साधणे हे खूप महत्वाचे आहे. असे म्हणतात की "भृशुंडी" ऋषीन्ना सतत गणपतीचे ध्यान करून नाकाजवळ किंवा भुवयांच्या मधून छोटी "सोंड" आली होती. म्हणूनच त्यांचे नाव "भृ" "शुंडी" असे पडले. उजव्या सोंडेचा गणपती हा "कडक", त्याचे फार सोवळ्यात करावे लागते असे नसून त्याचे कारण हे आहे की त्या उलट्या सोंडेकडे बघताना आपल्याला हे जाणवते की त्यापेक्षा आपल्याला डाव्या सोंडेच्या गणपतीकडे बघताना जास्त आनंद होतो. उल्हसित वाटते. तर त्याचे कारण मेंदू विज्ञानात आहे. आणि उजव्या सोंडेचा म्हणजेच अपसव्य दिशेने अथवा Anti -Clock Wise सोंड जाणारा असल्याने म्हणजेच जीवनाच्या उलट्या दिशेने जाणारा असल्याने फक्त "सन्याशांनी" म्हणजेच ज्यांनी जीवनाच्या उलट्या दिशेने प्रवास सुरु केला आहे त्यांनीच "उजव्या" सोंडेच्या गणेशाचे पूजन करावे असा संकेत किंवा दंडक आहे. सांसारिक माणसाने त्याचे पूजन केल्यास त्याचा संसार उध्वस्त होतो. सोवळे पाळले नाही म्हणून नाही. हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. इथे हिटलरचे उदाहरण अनाठायी ठरणार नाही. त्याने "आर्य" संस्कृतीचे प्रतिक म्हणून "स्वस्तिक" वापरले, पण उलटे....आणि त्याचा परिणाम आपल्याला माहित आहे. स्वस्तिक हे असे शक्तिशाली प्रतिक आहे की त्यातून "१ लाख" बोवीस एव्हढी उर्जा प्रती सेकंद बाहेर पडत असते. बोवीस हे अश्या प्रकारच्या मंत्र आणि यंत्रांच्या उर्जा मापनासाठी वापरले जाणारे "एकक" अथवा "युनिट" आहे. चला तर मग आपण डोळसपणे गणेशपूजन करायला शिकू या. नाहीतर ते नुसते आरत्या ओवाळणे आणि झांजा बडवणे एव्हढ्या पुरतेच सीमित राहील आणि गणपती बाप्पा अर्थात तुमच्यातीलच शक्ती, भक्ती, युक्ती हे सारे या गोंधळापासून दूरच राहणे पसंत करतील.....
आपण बोलत असलेले शब्दही येथेच सुप्त रुपात असतात. म्हणूनच श्री गणेशांची उपासना करताना मूलाधार चक्रावर लक्ष देऊन, पृथ्वी मुद्रा करून "गम" बीज असलेले, तसेच इतरही गणेश मंत्र, स्तोत्रे, श्लोक म्हणावयाचे असतात. त्यावेळेस समृद्धी मिळण्यासाठी "हिरव्या" रंगाच्या, पचन, आरोग्य, संपत्ती यासाठी "पिवळ्या" रंगाच्या, मनाला शक्ती मिळण्यासाठी "केशरी" रंगाच्या आणि मोक्ष प्राप्ती हेतू असेल तर "पांढऱ्या" गणेशाच्या पार्थिव, लाकडी अथवा धातूच्या मूर्तीचे पूजन करावे. हे गणपतीचे बाह्यरूप झाले. एकाग्रता साधणे हे खूप महत्वाचे आहे. असे म्हणतात की "भृशुंडी" ऋषीन्ना सतत गणपतीचे ध्यान करून नाकाजवळ किंवा भुवयांच्या मधून छोटी "सोंड" आली होती. म्हणूनच त्यांचे नाव "भृ" "शुंडी" असे पडले. उजव्या सोंडेचा गणपती हा "कडक", त्याचे फार सोवळ्यात करावे लागते असे नसून त्याचे कारण हे आहे की त्या उलट्या सोंडेकडे बघताना आपल्याला हे जाणवते की त्यापेक्षा आपल्याला डाव्या सोंडेच्या गणपतीकडे बघताना जास्त आनंद होतो. उल्हसित वाटते. तर त्याचे कारण मेंदू विज्ञानात आहे. आणि उजव्या सोंडेचा म्हणजेच अपसव्य दिशेने अथवा Anti -Clock Wise सोंड जाणारा असल्याने म्हणजेच जीवनाच्या उलट्या दिशेने जाणारा असल्याने फक्त "सन्याशांनी" म्हणजेच ज्यांनी जीवनाच्या उलट्या दिशेने प्रवास सुरु केला आहे त्यांनीच "उजव्या" सोंडेच्या गणेशाचे पूजन करावे असा संकेत किंवा दंडक आहे. सांसारिक माणसाने त्याचे पूजन केल्यास त्याचा संसार उध्वस्त होतो. सोवळे पाळले नाही म्हणून नाही. हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. इथे हिटलरचे उदाहरण अनाठायी ठरणार नाही. त्याने "आर्य" संस्कृतीचे प्रतिक म्हणून "स्वस्तिक" वापरले, पण उलटे....आणि त्याचा परिणाम आपल्याला माहित आहे. स्वस्तिक हे असे शक्तिशाली प्रतिक आहे की त्यातून "१ लाख" बोवीस एव्हढी उर्जा प्रती सेकंद बाहेर पडत असते. बोवीस हे अश्या प्रकारच्या मंत्र आणि यंत्रांच्या उर्जा मापनासाठी वापरले जाणारे "एकक" अथवा "युनिट" आहे. चला तर मग आपण डोळसपणे गणेशपूजन करायला शिकू या. नाहीतर ते नुसते आरत्या ओवाळणे आणि झांजा बडवणे एव्हढ्या पुरतेच सीमित राहील आणि गणपती बाप्पा अर्थात तुमच्यातीलच शक्ती, भक्ती, युक्ती हे सारे या गोंधळापासून दूरच राहणे पसंत करतील.....
No comments:
Post a Comment